डॉ. राजेश गायकवाड यांचा `बाप नावाची माय` हा ग्रंथ वडिलांचे माहात्म्य अधोरेखित करतो. तसेच ग्रामसंस्कृती, कृषिसंस्कृती, कुटुंबव्यवस्था आणि ग्रामीण माणसांचा दुःख, दारिद्र्याशी चाललेला संघर्ष यांचे दर्शन घडवितो. या ग्रंथातून आलेली बोलीभाषा आशयानुभूतीला प्रत्ययकारी व टवटवीत करणारी आहे. हा एक महत्त्वाचा विशेष यामधून प्रतीत झाला आहे.
-डॉ. कमलाकर चव्हाण