गल्लीत मुलींच्या अंगावरले दागिने बघून माझ्या ताईलाही तसे असावेत वाटणं साहजिक आहे. मग ती शेताकडे आल्यास खेळताना बाभळीची फुलं कानात घालायची अन् त्याच बाभळीच्या वाळलेल्या शेंगा एका दोऱ्यात ओवून त्याचं पैंजण करायची. त्या शेंगांचा आवाज तिला आनंद द्यायचा. राखी पौर्णिमेला दुकानातली राखी घेणं शक्य नव्हतं, मग कापसाला दोरा बांधून ओल्या हळद-कुंकवात बुडवून त्याची राखी तयार करून ती तिच्या गुरुजींच्या घरी जावून त्यांना बांधायची. त्यांनी ओवाळणीत टाकलेल्या एक-दोन पैशांत नवी पाटी आणायची. उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने गुन्हा रद्द केला, तेव्हा खूपजण म्हणाले, "सर, त्या मॅडमवर अब्रुनुकसानीचा दावा ठोका. जे जे चुकांना, अकार्यक्षमतेला, स्वार्थाना, ढोंगीपणाने जातीची, धर्माची ढाल वापरतात, ब्लॅकमेल करतात त्यांना अद्दल घडली पाहिजे. नाहीतर असंच सत्याला रोज मरत मरत व हरत हरत जगण्याची सवय लागेल व खोटारडे पाप करूनही पतीव्रतेसारखे उजळमाथ्याने फिरतील. या खोट्या गुन्ह्याचा कट रचणारे, या खोट्याला चालना देणारे, दुसऱ्याच्या खांद्यावर बंदुक ठेवून आपल्या कुप्रवृत्तीची पोळी भाजून घेणाऱ्या दारूड्या, पार्टीबाज प्रवृत्तीच्या नानाला वैयक्तिक फौजदारी दाखल करून गुन्हा नोंद करावा." असाही सल्ला मला काही मित्रांनी दिला. या सर्व बाबींवर थांबलो नाही, वकिलांशी सल्लामसलत सुरू केली. त्यांची फीस परवडणारी नाही असे वाटल्याने स्वतः केस लढवता येईल का? असा मनात विचार सुरू झाला. त्या दिशेने पाऊलही उचलाया लागलो. यातच वेळ, शक्ती किती वाया घालवावी असाही विचार येत होता. चिखलावर दगड फेकला तर आपल्याच अंगावर चिखल येणार हे खरे असले तरी या चिखलातून सुगंधी फुल उगवावे असे वाटते. सुराज्यासाठी या युद्धाचा हा प्रवास चालुच ठेवला व चालुच राहणार..
- भारत सातपुते
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : जागरण (आत्मचरित्र)